*युवकांनो थांबा, वय वाढले,लग्न होत नाही,म्हनुण नैराश्येकडे न जाता,चुकीचा निर्णय घेऊ नका* ================== सौजन्य : *राम आखरे नागपूर* मित्रांनो ज्या समाजा मध्ये तरूण युवक शिक्षित तो समाज शिक्षित, ज्या समाजात जास्त प्रमाणात तरूण युवक उद्योजक तो समाज आर्थिक सक्षम, आणि म्हणूनच समाजातील तरुणांनी विशेष करून ग्रामीण भागातील तरुण युवकांनी गरजे नुसार आवश्यक ते शिक्षण हे तर पुर्ण केलेच पाहिजे, परंतु नुसते शिक्षण घेऊन आणि डीग्री प्राप्त करून काही उपयोग नाही.जिवणात वेळेत प्रगती करायची असल्यास एक तर आपल्या शिक्षणाच्या जोरावर एखादी चांगली नौकरी मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न आणि चिकाटी असावी लागतेच. समजा नौकरीचे जमतच नाही.अशी परिस्थिती निर्माण झाल्यास,तर सोडुन द्या नोकरीचा नाद, पुन्हा आपल्या जिवणातील वेळ आणि संधी वाया न घालवता, आपल्या शक्ती आणि युक्ती प्रमाणे आपल्या जवळ आहे त्या आर्थिक बजेट मध्ये एखादा छोटा मोठा धंदा, व्यवसायाला सुरुवात करावी. परंतु धदा व्यवसायासाठी सर्व प्रथम आवश्यकता आहे ती आपल्या मनाची माणसिकता , चिकाटी,परिश्रम, सातत्य, थोडीफार ...
Comments
Post a Comment